प्राणकोट हत्याकांड (१९९८)

प्रणकोट हत्याकांड (१९९८) हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील प्रणकोट आणि डाकीकोट या गावात १७ एप्रिल १९९८ रोजी झालेले २६ हिंदूंची हत्याची घटना आहे. [१]

हल्ला संपादन

दहशतवाद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि गोमांस खाऊन त्यांचे धर्म परिवर्तन सिद्ध करावे या मागणीला गावक्यांनी नकार दिला तेव्हा मारेकऱ्यांनी हा हल्ला केल्याचे हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी सांगितले. [२] [३] धर्मांतर करण्यास नकार दिल्यास सर्व २६ जणांचे शिरच्छेद करण्यात आले ज्यात अनेक महिला आणि मुलं पण होती. [१] घराला आग लावण्यात आल्या मुळे त्या घरांमध्ये असलेल्या सात बळी गेलेल्या सदस्यांना ओळखले जाऊ शकले नाही.

परिणाम संपादन

हि बातमी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी १० तास लागले आणि सुरक्षा दला दिवसानंतरच पोहोचली. तेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले की ही धक्कादायक घटना आहे. मी यापूर्वी शोकांतिका पाहिल्या आहेत, परंतु ही रक्ताळणी होती. कोणतीही गोळी न चालविता गावकऱ्यांची हत्या केली गेली. " [४]

या हत्याकांडामुळे रियासी, पौणी थानपाल, चासाना आणि जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये सुमारे एक हजार लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले . [५]

एप्रिल २००८ मध्ये कथित सूत्रधार हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल हक उर्फ जहांगीरला भारतीय सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केले. [६]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "26 Hindu villagers butchered in Jammu". www.rediff.com. 2018-05-27 रोजी पाहिले.
  2. ^ Pioneer, The. "Ignoring spirit of the law". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2018-05-27 रोजी पाहिले.
  3. ^ Burns, John F. (1998-06-20). "Gunmen Kill 25 Hindus in Kashmir Attacks". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2018-05-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Kashmir Terrorists Behead 26 Hindus in Prankote". www.jammu-kashmir.com. Archived from the original on 2016-03-04. 2018-05-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Jammu averages 50 killings a month". www.rediff.com. 2018-05-27 रोजी पाहिले.
  6. ^ "The Tribune, Chandigarh, India - Main News". www.tribuneindia.com. 2018-05-27 रोजी पाहिले.