नलिनी चोणकर ह्या मराठी, हिंदी आणि गुजराथी या भाषेतील अभिनेत्री होत्या. नलिनी चोणकर यांचा जन्म १२ जून, १९३८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील कृष्णराव चोणकर हे बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक आणि नट म्हणून काम करणारे अभिनेते होते. त्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता, त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. ‘नलिनी चोणकर' 'मीरामधुरा’ नाटकातील त्यांचे सहकलाकार विश्‍वनाथ बागुल यांच्याशी नलिनी चोणकर विवाहबद्ध झाल्या.

नलिनी चोणकर
जन्म १२ जून, १९३८
मुंबई
मृत्यू २६ जून, २००५
मृत्यूचे कारण अर्धांगवायूच्या आजाराने
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा मराठी, हिंदी आणि गुजराथी अभिनेत्री
धर्म हिंदू
जोडीदार विश्‍वनाथ बागुल

चित्रपटसृष्टीतील जीवन संपादन

नलिनी चोणकर यांनी १९५७ साली ‘घरचं झालं थोडं’ या विनोदी चित्रपटात राजा गोसावी या नटाबरोबर सुरुवातीला काम केले. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा ठाकूर होते. नलिनी यांनी ‘राणी रूपमती’, ‘साजिश’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतही त्या उमठ्ल्या त्यांनी साकारलेल्या नायिकांच्या भूमिकांमुळे ‘श्रावणकुमार’, ‘सिंहलदीप की सुंदरी’ हे हिंदी चित्रपटही खूप प्रसिद्ध् झाले. १९५९ साली राजा नेने दिग्दर्शित ‘याला जीवन ऐसे नाव’ या विनोदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली. मधुसूदन कालेलकर निर्मित या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी, शरद तळवलकर या कलाकारांसमवेत नलिनी यांनीही अतिशय तन्मयतेने आपली भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्ये लक्षात आल्यावर त्यांना हिंदीतील ‘मदन मंजिरी’, ‘मॉडेल गर्ल’, ‘पिया मिलन की आस’ या चित्रपटांतूनही भूमिका मिळाल्या. नलिनी आपले वडील कृष्णराव चोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली १९६२ साली ‘नंदादीप’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा....’हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आजही प्रेक्षकांना ऐकल तर त्यांची आठवण होते. नलिनी केलेली ‘वाघ्यामुरळी’ या मराठी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आजही भारावते. स्त्रीयाची मानसिक होणारी कुचंबणा, देवाच्या नावाने सोडलेल्या मुरळीचं दैन्य त्यांनी त्यातल्या बारकाव्यांनिशी सक्षमपणे आपल्या अभिनयातून उलगडली. आपल्या नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या बळावर गुजराथी चित्रपटसृष्टी आपला ठसा उमटविला. ‘ढोल मारु’, ‘पाकीटमार’, ‘रानी रिक्षावाली’ या गुजराती चित्रपटांतील त्यांच्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘मत्स्यगंधा’, ‘प्रीतिसंगम’, ‘मीरामधुरा’, ‘बावनखणी’, ‘अठरावं वरीस धोक्याचं’ अशा दर्जेदार नाटकांमध्ये नलिनीं ताईनी काम केलं.[१]

व्यक्तिगत जीवन संपादन

चित्रपट निवृत्तीनंतरही नृत्य व अभिनयाशी असणारे त्यांचे दृढ नाते त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी १९८५ साली नृत्य, अभिनयाचे शिक्षण देणारी संस्था सुरू केली. अर्धांगवायूच्या आजाराने २६ जून, २००५ रोजी त्याचे निधन झाले.

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "चोणकर, नलिनी कृष्णराव". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2020-03-06 रोजी पाहिले.