खालील मजकूर लेखातील योग्य त्या विभागात हलवावा.

अभय नातू (चर्चा) २०:१५, २० सप्टेंबर २०१३ (IST)Reply


नळदुर्ग या नावाचा एक किल्ला महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात आहे. हा नळदुर्ग(२) उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे.

नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरुज आहेत.

इतिहास संपादन

नळदुर्ग(२) हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.

संरक्षण संपादन

संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. पाणी बोरी नदीचा प्रवाह वळवून या खंदकात आणण्यात आहे, हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूरुला किल्ल्यामध्ये सहजासहजी शिरकाव करता येत नाही. खंदकाशिवाय आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये नवबुरूज नावाचा वैशिष्ट्यपूर्ण असलेला बुरूज आहे. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे. या भल्याथोरल्या बुरजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरूज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.

नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. या बंधाऱ्याची भिंत २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. बंधाऱ्याच्या पोटातील या मजल्यांवरये जाण्यासाठी पायऱ्या आहेत, बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. भिंतीवर "या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील, तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल अशा अर्थाचा फारशी लिपीतील शिलालेख आहे. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत.

रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ, दरवाजाचा वक्राकार मार्ग या सर्वच बाबतीत हा नळदुर्ग किल्ला अद्वितीय आहे.

"नळदुर्ग" पानाकडे परत चला.