सुराज्य हे महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.


सोलापुरातील राजकीय आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमधील नेहमी एक पाऊल पुढे असणारे दैनिक म्हणून सुराज्यची ओळख आहे. या दैनिकाने नुकतेच १६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दैनिक सुराज्यने आतापर्यंत अनेक विषय हाताळले आहेत. सुराज्यने या वेळी वर्धापन दिनाचा खर्च टाळून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जे मरण पावले त्यांच्या कुटुंबीयासाठी सांत्वन निधी दिला आहे.

सोलापूर शहरातील डफरीन चौक ते कामत हॉटेलपर्यंत रोडवरील सुराज्यने दुतर्फा झाडे लावली आहेत

२०१८ साली सोलापूरमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी पडले होते. त्यासाठी रक्तदान शिबीर भरवून त्यामध्ये १००० स्वयंसेवकांना रक्तदान करण्यासाठी सुराज्यने प्रवृत्त केले होते.  

इतिहास संपादन

सुराज्यने अनेकाना आपल्या बातमीच्या आधारे न्याय देण्याचा प्रयत्न केले.दैनिक सुराज्यने या स्पर्धेच्या युगात नेहमी आपली एक वेगळी छबी निर्माण केली आहे. हे दैनिक कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारे आणि नेहमी उघड आणि सत्य मांडणारे दैनिक म्हणून ओळखले जाते. असे हजारो वाचक आहेत, ज्यांना सुराज्य वाचल्याशिवाय चैन पडत नाही. याचे एक कारण म्हणजे, सुराज्यमध्ये कोणतीही बातमी आली की, त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. यासाठी दैनिक आपली विश्वासाहर्ता टिकवून आहे.

पहिला अंक संपादन

सुराज्य पेपर २००४ साली सुरू झाला. आणि २०१९ साली त्याला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

संपादक मंडळ संपादन

सुराज्य पेपरचे संपादक राकेश टोळ्ये हे आहेत.  (२०१९ सालची हकीकत)

संदर्भ संपादन

[१]

  1. ^ "सुराज्य माहिती". http://www.dainiksurajya.com/. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)