मी विनायक मोहन दानेकरी मला असे वाटते कि स्वदेशी चळवळ ही भारतातील काही चळवळीपैकी एक महत्वाची चळवळ मानली जाते. स्वदेशी याचा अर्थ आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू होय. या चळवळीचा मुख्य उद्देश हा देशाला आवश्यक असणाऱ्या वस्तूचे उत्पादन देशातच करणे आणि देशात असणाऱ्या लोकांना त्या वस्तू उपभोगासाठी कमी किमतीत उपलब्ध करून देणे. याद्वारे परदेशी वस्तूचा खप कमी करणे व त्या वस्तूंना मिळणारा फायदा स्वदेशी वस्तूंना देऊन बाहेर जाणाऱ्या पैशावर निर्बंध घालणे .