महत्वकांक्षी वेडा सुलतान -मुहम्मद बिन तुघलक (१३२५-१३५१)

मुहंमद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.

इतिहासकारानी मुहम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-

त्याचे अनियोजित,कोणतीही पुर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व उताविळ पणामुळे त्याला ‘स्वप्नशिल’ , ‘वेडा महम्मद’ किंवा क्रुर-कृत्याकांमुळे ‘रक्त पिपासु’ सुद्धा म्हटलं जातं.

त्याचे वर्णन व कार्य खालिलप्रमाने-

बुध्दिप्रामान्यवादी उदार विचारी राज्यकर्ता प्रयोग व सुधारणा-अ]प्रशासकिय सुधारणा व राज बुद्धीप्रामान्यवादी ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच हो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

२)उदार विचारी राज्यकर्ता:- मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होलीसरख्या काही सणांममध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे साहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.


३)प्रयोग व सुधारणा- मुहंमद यास नाविण्यापूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे यात यो फार महत्वकांची होता.त्याला प्रशासनात उत्साह आणि राज्यकरभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल.

अ)प्रशासकीय सुधारणा:-राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.

देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करणण्याचे उद्देश व महत्वकांचा:-

१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यारून त्याासाने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.

२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज.

3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगर्दऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.

पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकाना सामोरे जावे लागले.

ब)आर्थिक व कृषी सुधारणा:-

सांकेतिक चलन- मोहंमद ने देेवगीरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यापूर्वक सुधारणा होती.त्या काळात चिंमध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होती.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते.पुढे अशाच प्रयोग कातु या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.

महंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्यााची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नान्याची नक्कल करून बनवू लागले.या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला.त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलनाला बंद करावे लागले.त्याचा हा दुसरा पण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते.कारण मध्ययुगीन काळात आशा निर्णय घेणे हे एका महत्वकांची राज्याच घेऊ शकत होता.पण असो त्याच्या या महत्वकांचेमुळे त्याला वेडा ठरवण्यात आला.पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.

सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:-

१)प्रचंड मोठे सैन्य व या सैन्याना लागणार प्रचंड वेतन यामुळें सरकारी तिजोरीतील तुटवडा भरण्यासाठी.

2)सोन्याचांदीचा तुटवडा असल्यामुळे सांकेतिक चलन काढण्यावर भर.

कृषीविषयक धोरण:- मुहंदाचे कृषिविषयक धोरण हे त्याच्या वडीला पेक्षा कठोर होते.त्याचे वडील गियासुद्दीन तुघलकानी अल्लाउद्दीनने सुरू केलेली पद्धत ज्यामध्ये शेतजमिनीच्या मोजणीनुसार आकारण्यात येणारी पद्धत मोडीत काढून त्या जागी 'प्रत्येक वेळी हातात आलेल्या पिकांची मोजणी करून त्यापैकी ठराविक भाग शेतसारा म्हणून सुरू केलं.खर तर गियासुउद्दीन तुघलक चे धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते.

पण मुहंमदने आपल्या शासन काळात कर वसुलीत शक्ती केल्याने तसेच करांची किंमत बरीच वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.दुष्काळ पडला तरी तो शक्ती ने 'चराई' तसेच 'घराई'कर वसुल करायचा.त्यामुळे शेतकरी वाढीव करांविरोधात बंड करत असत.हे बंड मोडण्यासाठी कठोर कारवाही करायचा.पण जेव्हा सतत ७वर्ष दुष्काळ पडला तेव्हा मूहम्मदने अनेक कृषीविषयक धोरण आखले.यात त्याने एक 'दिवाण-ए-अमीर-कोई'नावाचा विभाग सुरू केला.

बरणीनुसार पडीक व नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी सुलतानाने योजना आखली होती.त्या मध्ये शेतीत सुधारणा, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल जसे बार्लीच्या जागी गहू,गव्हाच्या जागी ऊस,तर उसाच्या जागी द्राक्ष. अश्या योजनांमुळे नक्कीच महसुलात वाढ होणे अपेक्षित होते.बरणीनुसार मुहंडाने दुष्काळावर मात करण्यासाठी दिल्लीत मंडतकेंद्रे उघडली, तसेच विहिरी खोदणे,शेटीआवजरे-बी बियाणे खरेदी करणे यासाठी कर्ज वाटप केले. त्याच्यायोजनांनमधील काही गोष्टी नक्कीच परिणामकारक होत्या.अशा म्हणणं दुमत ठरणार नाही जर त्याच्या योजनांकडे बारकाईने बघितले तर.....

शेवटचे पर्व:-

आपल्या शासन काळात शेवटच्या वेळी जेव्हा मोहम्मद तुघलकाणे गुजरातमधील विद्रोह मोडून परत येत असतानी वाटेत तो बिमार पडला आणि त्याला मृत्यूने वेढले.२0मार्च १३५१ रोजी मृत्यू पावला.

काही इतिहासकारांचे त्याच्यावरील भाष्य:-

१)बदयुनि-सुल्तानला त्याच्या प्रजेपासून व प्रजेला त्याच्यापासून सुटका मिळाली.

२)डाॅ.ईश्वरी प्रसाद नुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.

अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेढा ठरला असला तरी तो एक महत्वकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.