विष्णुबुवा ब्रह्मचारी
विष्णूबुवा / विष्णूबावा ब्रह्मचारी (जन्म : २० जुलै १८२५ - मृत्यू : १८ फेब्रुवारी १८७१) हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर विष्णूबावा असा केलेला आढळतो[१].
विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी | |
---|---|
जन्म नाव | विष्णू भिकाजी गोखले |
टोपणनाव | विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी |
जन्म |
२० जुलै १८२५ शिरवली, ता. माणगाव |
मृत्यू |
१८ फेब्रुवारी १८७१ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | वैचारिक, टीकाग्रंथ |
विषय | धर्म, सामाजिक प्रबोधन |
प्रसिद्ध साहित्यकृती | वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध, समुद्रकिनारीं वादविवाद, सेतुबंधनी टीका |
वडील | भिकाजी |
आई | उमाबाई |
विष्णुबुवांचा जन्म शिरवली या गावी (तालुका - माणगाव , जिल्हा - रायगड, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते.
विष्णुबुवांचे चरित्र, विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र (https://www.vishnubuvabrahmachari.com/) कार्यरत आहे.
विष्णूबावांची ग्रंथसंपदा संपादन
- बोधसागर; १८५७; गणपत कृष्णाजी; मुंबई
- भावार्थसिंधू; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
- वेदोक्त धर्मप्रकाश; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
- सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध; १८६७; इंदुप्रकाश; मुंबई
- चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ; १८६७; मुंबई
- सहजस्थितीचा निबंध; १८६८; इंदुप्रकाश; मुंबई
- समुद्रकिनारीं वादविवाद; १८७२; ओरिएंटल छापखाना; मुंबई
- सेतुबंधनी टीका - प्राकृत; १८९०; गणपत कृष्णाजी; मुंबई
संदर्भ संपादन
संदर्भसूची संपादन
- श्री. पु., गोखले. विष्णूबुवा ब्रह्मचारी आणि त्यांचे विचारधन.
- रामपुरे, बा. धों. विष्णूबुवा ब्रह्मचारी : काळ आणि कर्तृत्व. शोधगंगा : प्रबंधाचा दुवा. ०८ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)