"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द ) |
||
ओळ ५:
दुभती जनावरे आणि मेंढीपालन करणाऱ्या भटक्या धनगर समाजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.
== कारकिर्द ==
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या [[पेंढारी]] टोळीतून आपली
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
ओळ ३१:
मल्हारराव होळकर. होळकर घराण्याचे संस्थापक. आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनलेले एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगिकारणारे सेनानी. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य अनाथ धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.
मल्हाररावांचा जन्म धनगर कुटुंबातला. भटके जीवन. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच धनगरी भटकंतीत मुक्काम पडला होता होळ या गावी. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतांनाच खंडोजींचा मृत्यू झाला. भाऊबंदांचा जाच जसा वाढला तसा मायलेकांना सुलतानपूर परगण्यातील तळोदा येथील भोजराज बारगळांकडे आश्रय घ्यावा लागला. भोजराज हे मल्हाररावांचे मामा. होळमधील वास्तव्य संपले, पण होळ गावाचे नाव चिकटले..मल्हारराव 'होळकर' म्हणून वाढू लागले.
दाभाड्यांच्या सैन्यातील एक सरदार होता कंठाजी कदमबांडे. त्याच्या पेंढारी टोळीत सामान्य शिपाई म्हणून त्यांनी
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जीवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. पातशाहीचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता पातशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्वास पातशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला तरी या दोघा प्रबळ सरदारांचे सार्मथ्य पाहूनच पातशहा हा करार करायला प्रेरीत झाला होता.
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढय़ात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती ्रमत्यु या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.
|