"अरुण श्रीधर वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: en:Arun Shridhar Vaidya
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
''जनरल'' '''अरुण श्रीधर वैद्य''' (२७ जानेवारी, इ.स. १९२६; [[अलिबाग]], [[महाराष्ट्र]] - १० ऑगस्ट, इ.स. १९८६; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[भारतीय भूदल|भारतीय भूदलाचे]] १३ वे भूदलप्रमुख होते. [[दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध|इ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील]] कामगिरीबद्दल त्यांना [[महावीर चक्र]] पुरस्कार मिळाला. नंतर [[तिसरे भारत-पाकिस्तान युद्ध|इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात]] दुसर्‍यांदादुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. [[ऑपरेशन ब्लू स्टार]]च्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर [[खलिस्तान|खलिस्तानी]] अतिरेक्यांनी त्यांची [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे]] येथे ह्त्या केली.
 
== हत्या ==
भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले. १० ऑगस्ट, इ.स. १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचा अंगरक्षकही सोबत होता; व तोही पाठीत व मांड्यांत गोळ्या लागून जखमी झाला. [[खलिस्तान कमांडो फोर्स]] या अतिरेकी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली व [[सुवर्णमंदिर|सुवर्णमंदिरावर]] करण्यात आलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी वैद्यांना मा‍रल्याचा दावा केला. काही काळात वैद्याच्या मारेकर्‍यांनामारेकऱ्यांना पकडण्यात आले. इ.स. १९८९ मध्ये सुखदेव सिंग आणि हरजिंदर सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ९ ऑक्टोंबर, इ.स. १९९२ रोजी या दोघांना फाशी देण्यात आले.
 
{{विस्तार}}