"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
विसोबा खेचर (चर्चा | योगदान) No edit summary |
Amolagirhe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
सुंठ म्हणजे सुकविलेले आले. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक अत्यंत गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो. सुंठीची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते.
आलं वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्या मध्ये असलेले सर्व गुण सुंठे मध्ये असतात. सुंठेमुळे यकृतातील पित्त चांगल्या प्रकारे स्रवतं. सुंठेत ‘उदरवातहारक' गुण असल्यानं जुलाबाच्या (विरेचन) औषधा मध्ये ती मिसळतात. पचन संस्थेसाठी सुंठ अत्यंत उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचननिक्रिया साधारणत: मंदावते, पोटात वायू निर्माण होतो, कफप्रकोप होतो, हृदयात धडधड होते, हात-पाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचं चूर्ण दुधातून घेणं फायदेशीर असतं. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसंच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला ‘महौषधी' असं नाव देण्यात आलं आहे. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळेदूर होतो.
सुंठ तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. आमटीत-भाजीतही तिचा उपयोग केला जातो, मात्र गोड पदार्थ खास करून चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणारया गोड पदार्थाच्या पाककृती करताना जास्त उपयोग होतो. कोणताही पदार्थ बाधू नये, नीट पचावा, गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून गोड पदार्थात सुंठीची पूड घातली जाते. सुंठीचा वापर ‘पुरणपोळी' आणि‘आमरसात' केला जातो. कारण या दोन्ही पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हात्रास टाळण्यासाठी आमरसात आणि पुरणपोळीत सुंठ-तूप घालण्याचा प्रघात आहे. आता केवळ खाद्यपदार्थ शरीराला त्रासदायक होऊ नयेत, म्हणून सुंठीचा वापर केला जात नाही. पदार्थाचा दर्जा वाढावा, तो जास्त दिवस टिकावा म्हणूनही सुंठीचा उपयोग केला जातो.
==रामबाण सुंठ==
* सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये, म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असं औषध आहे. हा सुंठपाक स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम असून स्त्रीचं वंध्यत्वही दूर करण्याची ताकद त्या पाकात आहे.
* भूक वाढवून अन्नाचं पचन चांगलं करणं, आमवाताचा नाश करणं, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणं, गॅसेसचा त्रास होणं या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.
* सून्ठेच्या चूर्णात गूळ आणि थोडं तूप टाकून त्याचे तीन-चारतोळ्यां एवढे लहान लाडू बनवावेत. तेलाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसंच गॅसेसचा त्रास दूर होतो. पावसाळ्याात होणारया सर्दीवरही हेलाडू गुणकारी आहेत. पावसात काम करणारया शेतकरयांसाठी किंवा सतत पाण्यात काम करणारया मजुरांसाठी सुंठीचे लाडू अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर औषध आहे. यामुळे शरीरातली स्फूर्ती आणि शक्ती टिकून राहते.
* जुन्या सर्दीवरही सुंठेचं पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावं लागतं. त्याने जुनी सर्दी बरी होते. या उपायात सुंठेचा तुकडा मात्र रोज बदलावा लागतो.
* 'कावीळ' या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते.
* ताकात सुंठेचं चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.
* सुंठ आणि वावडिंगीचं चूर्ण मधात कालवून खाल्ल्यानं कृमी नष्ट होतात.
* आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणिखडी साखरेचं चूर्ण करून ते वरचेवर प्यावं.
==सुंठपाक==
सुंठपाक बनवण्यासाठी उत्तम प्रतीच्या सुंठेचं चूर्ण,तूप, गाईचं दूध आणि साखर लागते. आधी सांगितलेले सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा पाक तयार करावा. त्यात सुंठ, मिरं, पिंपळी, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र या सर्व वस्तू प्रत्येकी चारतोळे घेऊन त्याचं चूर्ण करून, ते पाकात टाकावं. हापाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरावा. यापाकाला ‘सौभाग्य सुंठपाक' किंवा ‘सुंठी रसायन' असं म्हणतात. रसायनगुणाने युक्त असा हा पाकखाल्ल्याने आमवात नाहीसा होतो, शरीराची कांती सुधारते. धातू, बळ आणि आयुष्य वाढतं.
|