महाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्रि होय. सह्याद्री पर्वताची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दर्यादऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हा मराठ्याच्या महाराष्ट्र वृत्तीची जननी आहे. <br /><br />बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी पर्वतराजी दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कर्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही पर्वतराजी कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि [[पुरंदर]] गड, [[वज्रगड]], जेजूरगड हे या रांगेतील प्रसिद्ध स्थळांत मोडतात. [[सिंहगड]] रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात. <br /><br />आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले होते. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास [[भुलेश्वर]] व दुसर्यादुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कर्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराण प्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.<br /><br />भागवतधर्माचे सासवडचे [[संत सोपान देव]], गणेशभक्तांचे आधिदैवत श्री सिद्धीविनायक आणि कर्हेच्या पावन तीरावरील स्वयंभू शिवालये ही या विस्तीर्ण पठाराची भूषणे आहेत. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रमातून पार्वतीबाईंना सुखरुप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामीनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामीभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर [[उमाजी नाईक]], प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कर्हेपठार.
===कर्हामाई===
ओळ २८:
===ऐतिहासिक सासवड===
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिध्दप्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कर्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.<br /><br /> शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांचे हे जाहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वर इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्वाचेमहत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिध्दप्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणूरेणूतही ते तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषामधून मिळते. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरु पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.