"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
 
==दार कमिशन व जे.वी.पी कमिटी==
डिसेंबर १९४८ रोजी प्रसिध्दप्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचेनेला विरोधदर्शविण्यात आला होता व [[महाराष्ट्रीय]] लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती.जे.वी.पी कमिटीने महाराष्ट्र व [[कर्नाटक]]च्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबईमहाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचं, उद्योगधंद्याचे शहरआहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास [[गुजराती]] भाषकांनी केल्याचे नमूद केले.
 
==फाजलअली आयोग==
ओळ ३५:
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय कॉंग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे कॉंग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. [[यशवंतराव चव्हाण]] यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर ''नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात'' असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व कॉंग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. [[सेनापती बापट]], एस.एम.जोशी, [[प्रल्हाद केशव अत्रे]], [[श्रीपाद अमृत डांगे|श्रीपाद डांगे]], [[शाहीर अमर शेख]], [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. [[श्रीधर माधव जोशी|एस.एम. जोशी]], [[श्रीपाद अमृत डांगे|श्रीपाद डांगे]] यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. [[शाहीर अमर शेख]],[[अण्णाभाऊ साठे|शाहिर अण्णाभाऊ साठे]],शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
 
२० नोव्हेंबर १९५५ [[मोरारजी देसाई]] व [[स.का.पाटील]] या कॉंग्रेस नेत्यांनी [[चौपाटी]]वर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुध्दा [[मुंबई]] महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'कॉंग्रेस जिवंत असेपर्यंत [[मुंबई]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु १९५६ रोजी केंद्रशासित [[मुंबई]]ची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या [[फ्लोरा फाउंटन]] भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. [[संयुक्त महाराष्ट्र समिती]]ने [[दिल्ली]] येथे प्रचंड [[सत्याग्रह]] घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणार्याहोणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.
 
==संयुक्त महाराष्ट्राची स्थापना==
१ नोव्हेंबर १९५६ला केंद्राने [[सौराष्ट्र]], [[गुजरात]],[[मराठवाडा]], [[विदर्भ]] व [[मुंबई]] इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू [[बेळगाव]]-[[कारवार]] वगळून) विशाल [[द्विभाषिक]] स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. कॉंग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणार्याहोणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. [[इंदिरा गांधी]]ने नेहरुंचे मन वळवले. द्वैभाषिकची विभागणी करताना [[महाराष्ट्र]] राज्याला [[गुजरात]] राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.<ref>य.दि.फडके, ''पॉलिटिक्स अँड लँग्वेज'', हिमालय पब्लिशिंग हाऊस, १९७९</ref> तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.<ref>लालजी पेंडसे, ''महाराष्ट्राचे महामंथन'', अभिनव प्रकाशन, १९६१</ref> मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात [[बेळगाव]], [[कारवार]], [[निपाणी]], [[बीदर|बिदर]] व डांगचा समावेश झाला नाही. [[बेळगाव]]बाबतचा [[[[महाराष्ट्र]]-[[कर्नाटक]] सीमाप्रश्न]] आजही चालू आहे.
नेहरुंना राज्याला हव असलेले '[[मुंबई]]' नाव वगळून समितीने '[[महाराष्ट्र]]'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची [[मुंबई]] ही राजधानी व [[नागपूर]] उपराजधानी निश्चित झाली.