"अन्नप्राशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB |
No edit summary |
||
ओळ १:
जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे.देवतांची पूजा, होम करून व दही,मध,तुप यांनी युक्त अन्न/ खिर बालकाला द्यावी.
ह्या संस्काराने आईच्या गर्भात घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो. असे सांगतात. म्हणून हा संस्कार करण्याची ही वहिवाट आहे. काहीजण गणपतीपूजन पूण्याहवाचन पर्यंत कर्म करतात. बालकाला दागिना (अलंकार) घालून मनाप्रमाणे इष्टदेवता कुलदेवतांची आठवण करावी. त्या देवतांच्या सानिध्यात आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करुन बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे दही, मध, तूप ह्यांनी युक्त असे अन्न घेऊन पहिला घास भरवावा.
नंतर जेवण झाल्यावर बालकाला भूमीवर बसवावे. त्याच्यापूढे पूस्तके, शस्त्रे, वस्त्रे इत्यादिक शिल्पसाधने उपजिवीकेची परिक्षा पहाण्यासाठी ठेवावीत. बालक स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथम हात लीवील ते त्याचे अपजिवीकेचे साधन होईल असे समजावे असे म्हणतात.
बालकाला अन्न पचविण्याची शक्ती येईल त्यावेळी हा संस्कार करावा. ६,८,९ अशा महिन्यात अन्न पातळ पदार्थ खाण्यास बालक सरासरी योग्य होतो.
{{विस्तार}}
{{सोळा संस्कार}}
|