संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
[[इ.स. १९६८]] सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी [[इ.स. १९७३]] साली ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह [[लता मंगेशकर | लता मंगेशकरांकडून]], तर अभंगवाणी पंडित भीमसेनांकडून[[भीमसेन जोशी]] यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि [[भीमसेन जोशी]] यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने एक भक्तिगीतांची तबकडी काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि [[सुरेश वाडकर]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[वीणा सहस्रबुद्धे]], [[उल्हास कशाळकर]] अशा अजून कितीतरी कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
खळेसाहेबांनीखळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती ,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली (१) सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला (२) देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; जिव्हाळातले (१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे (२) प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, (३)या चिमण्यांनो परत फिरा रे (४) चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०००हून१००० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित [[भीमसेन जोशी]], [[सुधीर फडके]], [[वसंतराव देशपांडे]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुमन कल्याणपूर]], [[माणिक वर्मा]], [[सुलोचना चव्हाण]] वगैरेंपासूनपासून ते [[हृदयनाथ मंगेशकर]], [[उषा मंगेशकर]], [[अरुण दाते]], [[सुधा मल्होत्रा]], [[सुरेश वाडकर]], [[देवकी पंडित]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[शंकर महादेवन]] यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांतली प्रसिद्ध गाणी: लताने गायलेले १) भेटी लागी जीवा अथवा २) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग; अथवा १) नीज माझ्या नंदलाला २) श्रावणात घननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची भावगीते; भीमसेन जोशींनी गायलेले १) सावळे सुंदर रूप मनोहर २) राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग; अथवा सुरेश फडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे सारखे चित्रपटगीत; वसंतराव देशपांड्यांनी गायलेले १) बगळ्यांची माळ फुले २) राहिले ओठातल्या ओठात वेडे; आशा भोसले यांचे १) कंठातच रुतल्या ताना २) टप् टप् टप् टप् काय बाहेर वाजतंय ते पाहू. अशी शेकडो गाणी आपण सहज आठवू शकतो.
त्यांची अजून काही गाजलेली गीते पुढील प्रमाणे-
सहज लक्षात राहिलेली आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १) वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २) हात तुझा हातातुन धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १ )धरिला वृथा छंद २) जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १) उतरली सांज ही धरेवरी २) बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद.
अशा तर्हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच. शब्दभावांना योग्य अशा समर्पक आणि कर्णमधुर चाली लावण्यात खळ्यांचा हातखंडा आहे.
==पुरस्कार==
{{DEFAULTSORT:खळे,श्रीनिवास}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[Category:संगीतकार|देव,यशवंत]]
[[en:Shrinivas Khale]]
|