"बल्लाळेश्वर (पाली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjaymjoshi (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sanjaymjoshi (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हे [[रायगड जिल्हा |रायगड जिल्ह्यातील ]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.[[गणेश पुराण|गणेश पुराणात]] [[विश्वामित्र ]]ऋषींनी भीमराजास, [[भृगु ]]ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर [[मुद्गल ]]पुराणात जाजलीने [[विभांडक]] ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. [[कृत]] युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना
{{अष्टविनायक}}
|