पुणे , मुंबई , नागपूर , नाशिक ही महाराष्ट्राची मर्मस्थाने येथून साडेतीनशे कि. मी. पेक्षा लांब. हैदराबाद खूप जवळ. त्यामुळे या भागात साठी ओलांडलेली अख्खी एक पिढी उस्मानिया विद्यापीठाची पदवीधर आढळते. पुण्या-मुंबईने केलेली उपेक्षा उदगीरकरांनी हैदराबादशी जैव संबंध प्रस्थापित करून भरून काढली.
इतिहास मोठा लहरी प्राणी असतो. सदाशिवरावभाऊ आणि निजाम यांना त्याने येथे झुंजविले , सदाशिवभाऊंना जिंकून दिले. उदगीर म्हटले की , लोकांना आठवते ते एवढेच. इतिहासात असा एखादा गाव रुतलेला राहिला की , फार कठीण जाते त्याला बाहेर पडायला.
उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्याचा लढाईसाठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले. उदगीरकरांना कळून चुकले , आपला वापर फक्त लढाईच्या मैदानापुरताच झाला. हातपाय हलविल्याशिवाय काही खरे नाही. तेव्हापासून आजतागायत मराठवाड्यात उदगीर एक मुक्त , स्वतंत्र , स्वाभिमानी , आपल्याच मस्तीत दंग राहणारे पण कर्तबगार असे गाव म्हणून ओळखले जाते.
कर्नाटकाची हद्द येथून 20 किलोमीटरवर. बिदर जिल्हा ओलांडला की , आंध्र प्रदेशाची सुरुवात. पुणे , मुंबई , नागपूर , नाशिक ही महाराष्ट्राची मर्मस्थाने येथून साडेतीनशे कि. मी. पेक्षा लांब. हैदराबाद खूप जवळ. त्यामुळे या भागात साठी ओलांडलेली आख्खी एक पिढी उस्मानिया विद्यापीठाची पदवीधर आढळते. पुण्या-मुंबईने केलेली उपेक्षा उदगीरकरांनी हैदराबादशी जैव संबंध प्रस्थापित करून भरून काढली. व्यापार , व्यवसाय , सोयर अशा अनेक परींनी उदगीरची आजही हैदराबादशी नाळ जोडलेली आहे. फेब्रुवारी महिना उजाडला की सालारजंग संग्रहालयाची सैर करायला आणि ' नुमाईश ' बघायला उदगीरकरांची कित्येक वषेर् धावपळ व्हायची