"रफी अहमद किडवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १८:
अलीगडमधील [[मुहम्मदान एंग्लो-ओरिएंटल कॉलेज]]मध्ये शिक्षण घेतल्यानंतर किडवई यांनी [[खिलाफत आंदोलन|खिलाफत आंदोलनच्या]] माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. [[१९२६ भारतीय सार्वत्रिक निवडणूक|१९२६ च्या निवडणुकीत]] ते औधमधील [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाचे]] उमेदवार म्हणून [[केंद्रीय विधानसभा|केंद्रीय विधानसभेवर]] निवडून गेले.
 
किडवई यांच्या राजकीय चातुर्याने वादग्रस्त मुद्द्यांवरून पक्षात एकता टिकवून ठेवण्यास मदत केली. १९२९ मध्ये किडवई विधानसभेत स्वराज पक्षाच्या सचिवपदी निवडल्या गेले. [[मोतीलाल नेहरू|मोतीलाल नेहरूंबद्दल]] त्यांची अत्यंत निष्ठा होती. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसनेकाँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी [[पूर्ण स्वराज्य|पूर्ण स्वराज्याची]] मागणी केली आणि महात्मा गांधी यांनी जानेवारी १९३० मध्ये नागरी अवज्ञा आंदोलन सुरू केले. जानेवारी १९४० मध्ये, कांग्रेस कार्यकारिणीने पूर्ण स्वराज ठरावाला प्रत्युत्तर म्हणून किदवई यांनी केंद्रीय विधानसभेचा राजीनामा दिला आणि नागरी अवज्ञा चळवळीत भाग घेतला.
 
प्रांत स्वायत्तता योजनेंतर्गत १९३७ मध्ये किदवई संयुक्त प्रांतातील आग्रा आणि अवध (यूपी) मधील गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात महसूल व तुरूंग मंत्री झाले. त्यांच्या कारभाराखाली जमींदारी व्यवस्थेला आळा घालणारा उत्तर प्रदेश हा पहिला प्रांत बनला. एप्रिल १९४६ मध्ये ते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री झाले.