"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ५९:
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, [[कन्नड]] तालुक्यातील [[वेळगंगा नदी]]च्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या ३० वर्षाच्या रत्नाकर फाटक नावाच्या बिजवरांशी. त्यांना आधीची दोन मुले होती.
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व
अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगांतून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून 'ब्राम्हण कोण' हा विषय उपस्थित करून ब्राम्हण आणि ब्राम्हणी सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राम्हण असून त्या काळात सडेतोड टीका केली. त्यांचे अभंग १७व्या शतकातील, पण ते प्रसिद्ध झाले विसाव्या शतकात. त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे.
|