"चिदंबरम सुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ५७:
चिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म ३० जानेवारी १९१० मध्ये [[कोइंबतूर]] जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी भाग घेतला.
 
तत्कालीन मद्रास प्रांतात १९५२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले व राज्यमंत्रिमंडळातही त्यांची निवड झाली. तमिळनाडूत राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम आदी नेत्यांबरोबर त्यांनी काम केले व कुशल, कर्तबार व कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून छाप पाडली. राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण हिच गुरूकिल्लीगुरुकिल्ली आहे, या भावनेने सुब्रमण्यम यांनी सर्वासाठी मोफत शिक्षण असूनही भयंकर दारिद्य, भूक यामुळे मुले शाळेत येत नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी या मुलांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास प्रारंभ केला व देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले.
 
केंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लालबहादूरशास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णकडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यम यांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थ ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे 'आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली.