"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ २:
'''भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध''' हे [[भारत]] व [[पाकिस्तान]] या दोन देशांमध्ये [[इ.स. १९६५|१९६५]] मध्ये झालेले दुसरे युद्ध होते.
==युद्धाची
इ.स. १९६०चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. [[शीत युद्ध|शीतयुद्धा]]<nowiki/>ला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे [[रशिया]]<nowiki/>चे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर [[जवाहरलाल नेहरू|नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा [[साम्यवाद|साम्यवादा]]<nowiki/>च्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणाऱ्या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] त्यामुळे बऱ्याच प्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.
ओळ २२:
==परिणाम==
दोन्ही देशातल्या काही लोकांनी हे युद्ध आपणच जिंकले असा दावा करायला
[[भारत]] आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अडचणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाई होती, ती अधिकच जाणवू लागली. म्हणूनच भारताने [[हरितक्रांती|हरित क्रांती]]<nowiki/>च्या दिशेने प्रयत्न करण्याचे मनावर घेतले.
इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत मोठी कामगिरी युद्धदकालात तसेच शांतताकालातही बजावली. ह्यामुळे भारत वाटतो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट [[रशिया]] म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. [[रशिया]]-[[चीन]] ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरून होतेच. ते वाढायला
भारताने युद्धात फारसे गमावले नाही. [[लालबहादूर शास्त्री|लालबहादुर]] शास्त्रींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालाच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्न केला असे झाले नाही. तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. [[अयुब खान|अयुबखान]] ह्यांना होणारा अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली; पण सत्ताधारी बदलले तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली.
|