"पुरुषोत्तम पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १:
'''प्रा. पुरुषोत्तम पाटील''' ([[जन्म]] : बहादरपूर - जळगाव जिल्हा, ३ मार्च, [[इ.स. १९२८]]; - धुळे, १६ जानेवारी, इ.स. २०१७) हे एक [[मराठी]] [[कवी]] आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. ते मूळचे [[अमळनेर]] तालुक्यातील ढेकू या गावचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पुरुषोत्तम पाटलांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर या गावी, आणि नंतरचे अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधे झाले. याच काळात त्यांनी कविता लिहिण्यास
फर्ग्युसन कॉलेजात असताना पाटलांच्या कविता सत्यकथामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी पुढे जनशक्तीमधे उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील शाळांच्या मुख्याधापकाची जबाबदारी स्वीकारली. कला शाखेची पदवी घेतल्यावर ते १९६१मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले.
ओळ ७:
पुरुषोत्तम पाटील यांनी काव्यलेखनाची प्रेरणा [[बा.भ. बोरकर|बोरकरांसारख्या]] थोर कवींकडून घेतली असली तरी त्यांची कविता कुठेही अनुकरणाच्या किंवा कुठल्याही प्रथेच्या आहारी गेलेली नाही. पुरुषोत्तम पाटील हे एक अव्वल दर्जाचे कवी आहेत, असे [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रजांनी]] ’परिदान’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
सन १९४७पासून काव्यलेखन
इ.स. १९८२मध्ये ‘सत्यकथे’चा अस्त झाला होता. आणि केवळ साहित्य या विषयाला वाहिलेली लघुनियकालिके फार मोठा पल्ला गाठू शकली नव्हती, हे जाणून पुरुषोत्तम पाटील यांनी कै. [[बा.भ. बोरकर]] यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले एक ’कविता-रती’ नावाचे द्वैमासिक सुरू केले. या नियतकालिकाचा पहिला अंक [[धुळे|धुळ्याहून]] ३० नोव्हेंबर १९८५ रोजी प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी पुरुषोत्तम पाटील हे ‘अनुष्टुभ’ मासिकाचे साडेचार वर्षे संपादक होते.
|