"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ १:
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. ज्यांना खान हा शब्द मुसलमानी वाटतो, ते तो शब्द खान्देश असा लिहितात.
 
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचा भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले.
 
खानदेशात लोक मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. (खानदेशी बोली नावाची एक स्वतंत्र बोली आहे?)
ओळ २९:
 
==खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती==
खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या. धुळे मधील चारुशीला पाटील उर्फ उर्वशी, साने गुरुजी-अमळनेर, शिरीषकुमार, प्रतिभाताई पाटील, प्रसिध्दप्रसिद्ध वकील उज्वल निकम हेही जळगावचेच.
 
==खानदेशातील बोली भाषा==
* खानदेशी
* अहिराणी :- अहिराणी ही खानदेशातील एक प्रमुख बोली आहे.
* [[लेवा बोली|लेवा गण बोली]] : लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.
 
१९७१ च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले