"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1563667 by ज on 2018-02-08T08:40:02Z |
||
ओळ ५:
निरनिराळ्या संहितांत [[विवाह]], त्यांचे प्रकार, पुत्रांचे विविध भेद, दत्तक पुत्राचे विधान, धन विभाग, दायभाग, [[श्राद्ध]], स्त्रीधन इ. विषयांवरील तत्कालीन समजुती आणि प्रथा आल्या आहेत, पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. ती सर्व एकत्रित व व्यवस्थितपणे मांडलेली स्मृतिग्रंथांत सापडते. स्मृतिग्रंथ हे आचारविषयक सिद्धांतांचे भांडार आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
==महत्व==
धर्मशास्त्राप्रमाणेच सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्त्व प्राप्त झाले. [[हिंदु]]ंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते.
एकूणच भारतीय समाजाची ्तत्कालीन परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते. भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. [[इंग्रजी]] अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत, ते या प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.
|