"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
File
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह अशा भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले. या चाळीत सुमारे ५०० कुटुंबे रहात होती. पहिले अपत्य [[मुकेश अंबानी]] याचा जन्म एप्रिल इ.स. १९५७ मध्ये, धीरूभाई यांचे दुसरे अपत्य अनिल याचा जन्म जून इ.स. १९५९ मध्ये, थोरली मुलगी दीप्ति हिचा जानेवारी १९६२ मध्ये तर धाकटी मुलगी नीना हिचा जन्म १/नोव्हेंबर/१९६४ रोजी झाला. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
 
इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी [[अमदाबाद|अमदावाद]] जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. इ.स. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड [[रशिया]], [[सौदी अरेबिया]], [[पोलंड]], [[झांबिया]], [[युगांडा]] इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायर्‍या चढू लागले. इ.स. १९७५ साली जागतिक बँकेनेबॅंकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
 
इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्‍नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. इ.स. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी [[विमल]] या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.