"आशा भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ६४:
[[इ.स. १९५७]]- [[इ.स. १९५८]] हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. [[सचिन देव बर्मन]] यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
[[ओंकार प्रसाद नय्यर|ओ. पी. नय्यर]] आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. [[इ.स. १९६०]] च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया
[[राहुल देव बर्मन]] यांच्याबरोबर काम करताना ''पिया तू अब तो आजा'' हे [[इ.स. १९७१ ]]चे [[
हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. [[सुधीर फडके]], [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंत कुमार]], [[लता मंगेशकर]], [[सुरेश वाडकर]], [[अनुराधा पौडवाल]] अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. [[बा.भ. बोरकर|बा. भ. बोरकर]], [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर|आरती प्रभू]], [[गजानन दिगंबर माडगूळकर|ग. दि. माडगुळकर]], [[शांता शेळके]], [[सुरेश भट]], [[सुधीर मोघे]] यांच्या कवितांबरोबर [[किशोर कदम|सौमित्र]]सारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
ओळ ७४:
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते [[ए.आर. रहमान]]पर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही [[दत्तात्रेय शंकर डावजेकर|दत्ता डावजेकर]]-[[श्रीनिवास खळे]] यांच्यापासून ते [[श्रीधर फडके]] यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. [[मधुबाला]]-[[मीनाकुमारी]]पासून ते अलीकडच्या [[तब्बू]]-[[ऊर्मिला मातोंडकर|उर्मिला मातोंडकर]]-[[ऐश्वर्या राय]]पर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी [[मोहम्मद रफी]], [[किशोर कुमार]] व [[सुधीर फडके]] यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज [[हृषीकेश रानडे]] सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए
[[कॅनडा]], [[इंग्लंड]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[स्वीडन]] आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
|