#*'''मूळ खडक''' : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्वाचा घटक असतो. प्रदेश्याच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठीण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते.त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा .महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगुर मृदा ’ असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा ’ तयार होते.
#*'''प्रादेशिक हवामान :''' मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्वाचा घटक आहे.मूळ खडकाचे विदारण होणे,हा मृदानिर्मितीतील पहिला टप्पा असतो.विदारण प्रक्रिया हि प्रदेश्याच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता तरावते .एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते.उदा , सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसौल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जम्भी मृदा तयार होते. हा नृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणार्या रेगुर मृदेपेक्षा वेगळा आहे.
#*'''जैविक घटक:''' खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो;परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भूग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात.वनस्पतींची मुळे,पालापाचोळा ,प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात ,तसेच त्यांचे विविध जीवान्मार्फात विघटन होते .उदा ,गांडूळ ,वाळवी,गोम ,मुंग्या .अशा विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल,तर मृदा सुपीक असते .अनेक जीवन्मार्फात विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग मोठया प्रमाणात केले जातात.
#*'''कालावधी :''' मृदानिर्मिती हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे . या प्रक्रीयेमध्ये मूळ खडकाचे विदारण ,हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. हि प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी मोठा असतो . उच्च दर्ज्याच्या मृदेचा कालावधी २.५ सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो . जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद होत असते . त्यामानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो .निसर्गाकडून मिळालेली ‘मृदा ’ एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते,किटकनाशके यांचा वापर केला जातो,त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते.