"नानाजी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संदर्भ |
No edit summary |
||
ओळ ५४:
}}
'''चंडिकादास अमृतराव देशमुख''' ऊर्फ '''नानाजी देशमुख''' ([[ऑक्टोबर ११]], [[इ.स. १९१६|१९१६]] - [[फेब्रुवारी २७]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी]] सामाजिक कार्यकर्ते होते. [[भारत सरकार|भारतीय शासनाने]] त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर [[भारतरत्न]] पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाने]] त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
==चरित्र ==
ओळ ६७:
[[चित्रकूट]] हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, [[ग्रंथालय]], मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान [[मध्य प्रदेश]] व [[उत्तर प्रदेश]] या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.{{संदर्भ हवा}}
आणीबाणीनंतरच्या काळात ([[इ.स. १९७७]]) नानाजी काही काळ [[लोकसभा|लोकसभेचे]] सदस्य होते. [[इ.स. १९९९]] मध्ये त्यांची [[राज्यसभा|राज्यसभेवरही]] निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब बहाल केला.{{संदर्भ हवा}}.
== संदर्भ ==
|