संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/communication-skill/articleshow/60724332.cms|शीर्षक=संवाद कौशल्य|last=|पहिले नाव=|दिनांक=१८ सप्टेंबर २०१७|संकेतस्थळ=https://maharashtratimes.indiatimes.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ जानेवारी २०१९}}</ref>
[[==संवादाचे प्रकार=]]==
१) आत्म संवाद =- प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वतःशीच एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात. आणि तो आपल्या सद्सद विवेक बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो, आणि त्या नुसार तो निर्णय घेत असतो. स्वतालाच प्रश्न विचारणे, स्वत उत्तर देणे म्हणजे स्वतःलाच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते.
२) द्वीव्य्क्तीय संवाद =- दोन व्यक्तींमधील संवाद यात सहसा तिसरा व्यक्ती सामील नसतो. हा संवाद व्यक्तिगत,थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो. ज्यात शब्द,हातवारे ए.चा वाव असतो.या संवादामुळे व्यक्तीचे मन वळवणे,तसेच एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होते.या संवादामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. तसेच तात्काळ प्रतिसादही मिळतो.
३) समूह संवाद =- जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, यात समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त संख्या ठरत असते. सदर संवाद हा नियंत्रित वातावरणात पार पडते.द्वीव्य्क्तीय संवादाच्या वैशिष्ट्यांचे कमी प्रमाणात असलेले अस्तित्व हे समूह संवादाच्या ठळक वैशिष्ट्य असते.
४) = जनसंवाद =- समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळख्त नाहीत, त्यामुळे संवादाछ म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर होत नाही आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते.