"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ९:
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
 
हा पुतळा ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने'' संसद परिसरासाठी भेट दिला होता आणि यासाठी आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा [[मुंबई]]चे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. ब्रह्मेश वाघ यांना हा पुतळा बनवण्यासाठी आंबेडकरांच्या पत्नी [[सविता आंबेडकर]] यांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या परिश्रमानंतर तयार झाला आहे. यापूर्वीही ब्रह्मेश वाघ यांनी इ.स. १९५९ साली [[मुंबई|मुंबईतील]] कूपरेज मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम पुतळा तयार केला होता.<ref=लोकराज्य>{{जर्नल स्रोत|last1=मानकर|first1=मिलिंद|शीर्षक=बाबासाहेबांचे पुतळे|जर्नल=लोकराज्य|दिनांक=डिसेंबर २०१७|page=६६|pages=१४ व १५}}</ref>
 
=== अनावरण===
भारताचे तत्कालीन [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांच्या हस्ते २ एप्रिल १९६७ रोजी आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.<ref>http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref> ''‘ज्ञानार्जन चालू ठेवा, सत्याचा शोध घ्या व ते आचरणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करा, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीयांना संदेश आहे’'' असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात काढले. राष्ट्रपती पुढे म्हणाले, ''‘लोकशाही पद्धतीवर डॉ. आंबेडकरांची नितांत श्रद्धा होती. रक्तपात होऊ न देता समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडविता येणे शक्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता, हे भारतातील अनेक स्थित्यंतरांवरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय ऐक्यावर त्यांचा भर होता. भारतात जोपर्यंत हिंदू, मुस्लिम, सिंधी, तमिळी असे भेदभाव राहतील तोपर्यंत भारताती प्रगती होणार नाही, असे त्यांचे विचार होते.’'' राष्ट्रपतींच्या भाषणानंतर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'चे अध्यक्ष व भारताचे गृहमंत्री [[यशवंतराव चव्हाण]], लोकसभेचे सभापती नीलम संजीव रेड्डी यांनीही आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अनेक विशेषणांनी गौरव केला. अनावनण सभारंभाला उपराष्ट्रपती [[झाकीर हुसेन]], उपपंतप्रधान [[मोरारजी देसाई]], रिपब्लिकन नेते [[दादासाहेब गायकवाड]], बाबासाहेबांचे चिरंजीव [[यशवंत आंबेडकर]], हुमायून कबीर व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.<ref=लोकराज्य></ref>
 
अनावरणापूर्वी [[श्रीलंका]] व [[सांची]] येथील [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी यशवंत आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर [[बौद्ध|बौद्धांना]] ''[[पंचशील]] दीक्षा'' दिली. त्या 'भव्य स्मारक शिल्प' दिवशी बाबासाहेबांचा जयघोष केला.बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या भावमुद्रेवरून ते भारतीय जनतेला 'नीतिधर्माप्रमाणे आचरण करा, राज्यघटनेचे पावित्र्य राखा आणि शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत राज्यघटनेत सांगिल्याप्रमाणे देशाचे संरक्षण करा,' या संदेशाचे स्मरण करून देत आहेत, असेच वाटते.<ref=लोकराज्य></ref><ref>भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव, दैनिक वृत्तरत्न सम्राट,
दि. १४ एप्रिल २०१७, जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४ </ref>
 
संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी [[जवाहरलाल नेहरू]]ंचे वडील [[मोतीलाल नेहरू]] यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.<ref=लोकराज्य></ref>
 
== हे सुद्धा पहा==
* [[समतेचा पुतळा]]
Line २७ ⟶ २८:
{{संदर्भयादी}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग: भारतीय संसद]]
[[वर्ग: भारतातील पुतळे]]
[[वर्ग: चित्र हवे]]