"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६९:
==संतती नियमन==
गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ अगोदर ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. [[बीजांड]] परिपक्व होऊन [[बीजपुंज|बीजपुंजा]]पासून अलग होण्याच्या काळात केलेला [[समागम]] देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी [[शुक्रजंतु]] जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते.<ref>[http://marathi.aarogya.com/index.php?option=com_content&task=view&id=368&Itemid=356 मराठी आरोग्य.कॉम]</ref>
==मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार==
मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, उदाहरणार्थ -
 
*नियमित व्यायाम
*संतुलित आहार घेणे;
*आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे);
*मासिक पाळीच्या वेदनांसाठी पॅरासिटेमॉल घेणे;
*गरम पाण्याची बाटली वापरणे
'''मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ.'''
 
*विशिष्ट पूरक वनौषधी घेणे
*आल्याचा चहा पिणे
*जंगली सुरणासारख्या पेटके-विरोधी भाज्या खाणे ;
*ओटीपोटावर लव्हेंडर तेल चोळणे;
*रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे;
*जिंक्गो हे पूरक औषध घेणे
*विशिष्ट पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडीज्) घेणे
*मसाज करून घेणे
*ऍक्युपंक्चर करून घेणे
'''मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात'''
 
*सूज-विरोधी
*संप्रेरके बदलणे (हार्मोन रिप्लेसमेंट)
*नियमित पाळीसाठी तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या
फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. ह्याप्रकारच्या बर्याआच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.