"दलित पँथर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ६:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी जहाल युवक चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे दलित पँथर होय. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ''[[ब्लॅक पँथर (राजकीय पक्ष)|ब्लॅक पँथर]]'' या संघटनेचा प्रभाव दलित पँथरवर होता. १९६६ साली ह्यू.पी. न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पँथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलँड येथे केली. दरम्यानच्या काळात त्यावर अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून ([[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श]], टाईम आणि अन्य समकाल्रीन साप्ताहिके) येत असत. सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे ब्लॅक पँथर या संघटनेविषयी उत्सुकतेपोटी चर्चा होत असे. वास्तविक अशा प्रकारच्या संघटनेने आपले नेतृत्व करावे यासाठी त्यांनी प्रयत्‍न सुरू केले.
 
== उदय==दलित पंथर ची निर्मिती का झाली
== उदय==
इ.स. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला [[मधु लिमये| मधु लिमयें]]नी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला.<ref>'ए लोकसभा स्पीच ' जनता मधील संपादकीय, संपादक - एन्.जी.गोरे, XXVII क्रं.२०, ४ जून १९७२ </ref> या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली<ref>१९ जून १९७२ नवाकाळ</ref> आणि पँथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई) येथे ९ जुलै १९७२ रोजी भरली. बैठकीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले.<ref> हायकोर्टाने वरळी आणि बी.डी.डी.चाळ, नायगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या कमिशन पुढे श्री.ज.वी.पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.(पा.८)</ref> १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात [[राजा ढाले]] यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पँथरमधे प्रवेश केला. प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होती. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाऱ्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले.
 
पँथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हटले आहे :
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित_पँथर" पासून हुडकले