"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
'''सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या''', 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); [[सप्टेंबर १५]] [[इ.स. १८६१|१८६१]] - [[एप्रिल १४]] [[१९६२]]). हे एक [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा [[भारत|भारतातील]] सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो.काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
 
 
==चरीत्र==
===बालपण===
यांचा जन्म [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी [[म्हैसूर]] राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक [[संस्कृत]] विद्वान होते व [[हिंदू]] ग्रंथांचे भाष्यकार असून [[आयुर्वेदिक]] वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे [[मोक्षगुंडम]] या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[प्रकाशम]] जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परत[[कुर्नुल]] येथुन [[मुद्देनहळ्ळी]] ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण [[चिकबळ्ळापूर ]] येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण [[बंगळूर|बंगलोर]] येथे झाले. ते १८८१ साली [[मद्रास]] येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी [[कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे]] मध्ये [[पुणे]] येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
<!-- [[Image:SirMVfamily.JPG|250px|thumb|right|A family photograph]] -->
 
===अभियंता म्हणून वाटचाल===
अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी [[बॉम्बे]] (सध्याचे [[मुंबई]]) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना [[भारतीय पाटबंधारे महामंडळ]] येथून निमंत्रण आले.त्यांनी, [[दख्खन]] क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील [[खडकवासला]] धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण [[ग्वाल्हेर]] व [[कृष्णराज सागर]] धरण [[म्हैसूर]] येथे बसविण्यात आली.
विश्वेश्वरैया यांनी [[हैदराबाद]] शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.[[विशाखापट्टणम]] बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
ओळ ५०:
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. [[तिरुमला]]-[[तिरुपती]] दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
 
===म्हैसूर येथे दिवाण म्हणून===
<!-- Image with unknown copyright status removed: [[Image:Mokshagundam Vishveshwaraiya.jpg|right|float]] -->
सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,[[म्हैसूर]] या [[भारत|भारतातील]] मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांना,नियुक्त केल्या गेले.
[[कृष्णराज वोडेयार चतुर्थ]] या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये [[बंगळूर|बंगलोर]] येथील [[शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय]] याची त्यांनी स्थापना केली.ती भारतातील एक प्रथम अभियांत्रीकी संस्था होती. ती अद्यापही [[कर्नाटक|कर्नाटकातील]] एक गणमान्य संस्था आहे.
 
===विविधपुरस्कार मान [[सेमनान प्रांत|सन्मान]]===
[[चित्र:MVBharatRatna.JPG|120px|thumb|right|त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक]]ते म्हैसूर येथे दिसतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविल्या गेले.भाला सत्र् मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले. [[Image:kie.jpg|120px|thumb|left|'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक]] सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय [[इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स]] या[[लंडन]] स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर [[इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स]] च्या [[बंगळूर|बंगलोर]] शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.
 
===मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर===
त्यांचे आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मुर्ती दिसली.ती कोणाची आहे अशी गावात विचारपुस केल्यावर,कोणीच समोर येइना. म्हणुन तिने ती घरी आणुन त्याची घरी प्रतीस्थापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय.हे हनुमानाचे मंदिर अजुनही अस्तित्वात आहे.
 
===मुद्देनहळ्ळी येथिल स्मारक===
[[Image:Sir mv.jpg|120px|thumb|left|सर मो.विश्वेश्वरैया यांची मुद्देनहळ्ळी येथिल समाधी]] [[नंदी हिल्स]]च्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक [[मुद्देनहळ्ळी]] येथे उभारण्यात आले आहे.