'''मराठी बौद्ध''' हा [[महाराष्ट्र]]ातील [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक [[मराठी]] मातृभाषा म्हणून बोलतात. [[१४ ऑक्टोबर]] [[१९५६]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर आंदोलणात दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५१ च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ होती. आणि १९६१ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ झाली. प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. २०११महाराष्ट्रात मध्येबौद्ध महाराष्ट्रातधर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही '''१६%''' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीयबौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना [[नवबौद्ध]] (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेले आहेत.