"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १०:
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
 
==पुष्पा भावे यांची [[शिवसेना]] आणि [[बाळ ठाकरे]] यांच्याबद्दलची मते==
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.misalpav.com/node/11297}}
आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावे यांनी [[शिवसेना]] व [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:<br />
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.<br />
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे [[शिवसेना]]. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.<br />
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोईस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरू झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.
४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेव्हा ते ध्यानात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.<br />
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होत आहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारे नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.<br />
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. [[पुष्पा भावे]] या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर होत्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग नव्हता, दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
 
==पुष्पा भावे यांचे लेखन==