"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr Abhiraj (चर्चा | योगदान) No edit summary |
Dr Abhiraj (चर्चा | योगदान) |
||
ओळ १०८:
[[चित्र:Qutub minar.JPG|thumb|200px|left|[[कुतुबमिनार]]]]
{{main|दिल्ली सल्तनत}}
१२ व्या शतकात [[पृथ्वीराज
१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील [[तैमूरलंग]] या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.<ref>[http://www.gardenvisit.com/travel/clavijo/timurconquestofindia.htm Timur - conquest of India]</ref> त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=The History of India As told By Its Own Historians Vol III|लेखक=Elliot & Dawson |पृष्ठ=445-446 }}</ref> तैमूरलंग च्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये [[बाबर]] या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.
|