"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|नारायण हरी आपटे}}
'''हरी नारायण आपटे''', अर्थात '''ह.ना. आपटे''', ([[मार्च ८]], [[इ.स. १८६४]] - [[मार्च ३]], [[इ.स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]], कादंबरीकार[[कादंबरी]]कार, नाटककार[[नाटक]]कार, [[कवी]] व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश[[ज्ञान]][[प्रकाश]] या मासिकांचे काही काळ [[संपादक]], आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. [[अकोला]] येथे भरलेल्या [[महाराष्ट्र]] [[साहित्य]] संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने[[स्त्री]]रत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची [[लीलावती]], [[राणी दुर्गावती]] इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. [[केशवसुत|केशवसुतांची]] [[कविता]] आणि [[गोविंद बल्लाळ देवल]] यांचे [[संगीत शारदा|शारदा]] हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.
 
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन [[मराठी]] कादंबरीचे [[जनक]] मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ [[युग]] म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. ''धूर्तविलसत'', ''मारून मुटकून वैद्यबुवा[[वैद्य]]बुवा'' व ''जबरीचा [[विवाह]]'' ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या[[मोलियर]]च्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, ''जयध्वज'' (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), ''श्रुतकीर्तचरित'' (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व ''सुमतिविजय'' ([[शेक्सपियर|शेक्सपियरचे]] ’मेझर फॉर मेझर’) ही [[रूपांतरित नाटके]] आहेत. त्यांनी [[मुंबई]] मराठी [[ग्रंथ]] संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. ''बिचारा'' या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरीच्या]] अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार[[निबंध]]कार चिपळूणकर[[चिपळूण]]कर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.
 
{| class="wikitable sortable"