वामन नरहरि शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५ (शके वै.शु.१६१७) ) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>
==माहितीची अनिश्चितता==
वामन पंडिताबद्दल अनिश्चित माहिती मिळते. कोणी वामन पांच आहेत असें समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळें कोणी वामन दोन होते असेंहि मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तुहरीच्या श्लोकांचें भाषांतर करणारा वामन हे दोन भिन्न असेंहि कोणी म्हणतात.महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील मतानुसार याबद्दल वाद आहे.
==वामन नरहरि शेष==
वामनयांचा पंडितजन्म (१६३६[[नांदेड]]चा तेसमजला १६९५):-जातो{{संदर्भ एक महाराष्ट्रीय कवि हा ॠग्वेदी वासिष्ठगोत्री ब्राह्मण असूनहवा}}. मूळ विजापूरचा राहाणारा. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>याचें आडनांव 'शेष'. बापाचें नांव नरहरि व आईचें नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून हा विद्याव्यासंगी व बुध्दिमान होता. यानें लहानपणींच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. तो कांहीं दिवस विजापूरच्या दरबारीं होता. पण जेव्हां विजापूरच्या बादशहास त्याला बाटवावें असें वाटलें तेव्हां त्यानें विजापूर सोडलें. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>उदरनिर्वाहाकरितां कांहीं दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणीं हिंडून पुढें तो काशीक्षेत्रीं गेला. तेथें एका मध्वमतानुयायी गुरुजवळ यानें वेद व शास्त्रें यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्यानें ठिकठिकाणीं पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करुन अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रें मिळविलीं. वामन पंडित हा प्रथमतः द्वैतमतवादी होता परंतु त्याच्या मनाचें त्या विचारसरणीनें समाधान होईना. करतां त्यानें निरनिराळया मतांच्या ग्रंथांचें अवलोकन करुन अनेक शास्त्रीपंडितांच्या गांठीहि घेतल्या परंतु त्याच्या मनाचें समाधान झालें नाहीं. निराशेनें कंटाळून शेवटीं जीव देण्याच्या विचारापर्यंत त्याची मजल गेली होती. परंतु तो पुढें मलयाचल पर्वताकडे गेला. तेथें त्याला एका यतीनें गुरुपदेश केला. ही हकीकत त्यानें 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथांत आरंभीं विस्तारानें दिली आहे. निगमसागर ग्रंथ शक १५९५ सालीं लिहिल्याचा त्याच्या ग्रंथांतच उल्लेख केला आहे. वामन पंडिताबद्दल अनिश्चित माहिती मिळते. कोणी वामन पांच आहेत असें समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळें कोणी वामन दोन होते असेंहि मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तुहरीच्या श्लोकांचें भाषांतर करणारा वामन हे दोन भिन्न असेंहि कोणी म्हणतात. याबद्दल वाद चालू आहे.