"अलिप्ततावादी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो {{पानकाढा}} |
|||
ओळ १:
{{वर्ग}}
===अलिप्त राष्ट्रगट चळवळ===
अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी १९५४मध्ये कोलंबोतील एका भाषणात केला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. ’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्ततावादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की, “कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊ; आम्ही सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो. अमेरिका, रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल.” ’अलिप्ततावादाचे उद्गाते’ असे नेहरूंना संबोधले जाते. नेहरूंनी आपल्या आचरणातून अलिप्ततावादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. विधायक क्रियाशील व निश्चित स्वरूपाचा नीतीप्रवाह म्हणून अलिप्ततावादी धोरणास महत्त्व आहे.
Line १९ ⟶ २०:
[६] '''१९७९, हवाना परिषद''' : ९४ सदस्य. मतभेद स्पष्टत: दाखविणारी परिषद. क्युबा व व्हिएटनाम यांचा समाजवादी गटाशी जवळिकीचा तर सिंगापूर व झायरे यांचा पाश्चात्य गटाशी जवळिकीचा इरादा. समाजवाद हा अलिप्ततेचा ’स्वाभाविक सहकारी’ आहे ह्या फिडेल कॅस्ट्रोंच्या युक्तिवादास भारत आणि इतर राष्ट्रांचा आक्षेप. कॅम्पडेविड समझोत्यामुळे इजिप्तच्या हकालपट्टीची इतर अरब देशांची मागणी. हिंदी महासागर ’शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याची मागणी. <br>
[७] '''१९८३, नवी दिल्ली परिषद''' : ९९ सदस्य, २० निरीक्षक, १९ पाहुणे. अण्वस्त्रनिर्मिती व शस्त्रास्त्रस्पर्धा थांबविण्याचे आवाहन. अणुचाचण्यांवर बंदीची मागणी, आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी, हिंदी महासागरावरील लष्करी हालचाली थांबविण्याची आणि दिएगो गार्सिया बेट मॉरिशसला परत करण्याची मागणी, पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याचे आवाहन, अविकसित राष्ट्रांच्या विकासासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पुनर्रचनेची मागणी. <br>
[८] '''१९८६, हरारे परिषद''' : १०१ सदस्य राष्ट्रे, रौप्य महोत्सव. जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधी. वंशवादी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कडक निर्बंध, नामिबियाच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या खास अधिवेशनाची मागणी, ’आफ्रिका निधी’ची स्थापना, इराण-इराकने युद्ध थांबविण्याची मागणी.<ref>
[९] '''१९८९, बेलग्रेड परिषद''' : १०३ सदस्य राष्ट्रे. राजीव गांधींची निसर्गाच्या रक्षणासाठी चळवळ उभी करण्याची मागणी. विकसित राष्ट्रांशी संवाद सुकर व्हावा यासाठी ’पंधराच्या गटाची’ स्थापना. <br>
[१०] '''१९९२, जाकार्ता परिषद''' <br>
|