"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६:
 
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
सूरज एंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=सूरज येंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४३-४५}}</ref> त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी [[कांशीराम]] यांचे '[[चमचायुग]]' हे पुस्तक वाचले होते. त्यात [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी पेपर विकण्याची काम दोन वर्ष केले. ते लहानपणापासून कविता करायचे. त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे. सूरज यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. ते नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये शिकले. पुढे नांदेडच्या विधि महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, तेथे ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहायचे. या महाविद्यालयात सरंजामी वातावरण असतानाही ते जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून निवडून आले. होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> ते स्टुडंट कौन्सिलवर सलग तीन वर्षे निवडून गेले आणि विद्यापीठात तिसरे आले. लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत तसेच वाद-विवाद स्पर्धेत भाग घ्यायचे.
 
त्यानंतर ते मुंबई विद्यापीठात एलएलएम करू लागते. येथे त्यांचे प्रा. सुरेश माने हे एक सर होते. तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला. मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी पर्यावरण विषय सुद्धा निवडला होता. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थी मिळून पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार्‍या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध उच्च न्यायालयांमध्ये पीआयएल (जनहित याचिका) टाकल्या होत्या. कारण पर्यावरण हा मानवाधिकार होता. मुंबई विद्यापीठात सुद्धा ते जनरल सेक्रेटरी होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ३१ जानेवारी २०१० रोजी ते लंडनला रवाना झाले. तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते जिनिव्हा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले.<ref name="auto1"/> ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून [[पीएच.डी.]] पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] एका उपक्रमात काम करत आहेत.