"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८६:
|}
 
== डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस ==
[[महाराष्ट्र सरकार]]च्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस]] ([[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]]) या नावाने [[इंग्रजी]] भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९७९|१९७९]] रोजी झाले होते.
 
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन [[भारत सरकार]]च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा [[हिंदी]] अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.<ref>[http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय, २१ खंड पीएफ में]</ref> या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
== पत्रकारिता ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला [[इ.स. १९२०]] मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. [[इ.स. १९१७]] साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ''“पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.”'' हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.