"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
आंबेडकरांनी ऐतिहासिक दीक्षा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी पोरसवदा सदानंद फुलझेले यांच्यावर टाकली होती. फुलझेले त्या वेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते. नव्वदीपार केलेले फुलझेले ही आठवण सांगताना एकदम टाइम मशीनमध्ये बसल्यासारखे त्या काळात जाऊन आठवण सांगत. त्यांच्या जाण्याने अशा असंख्य आठवणी आता पोरक्या झाल्या आहे. २०१९ च्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वेळी त्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत... “आपले नागपूरचेच आर. जे. मून आॅल इंडिया रेडिओला सेक्शन आॅफिसर होते. त्यांना घेऊन मी बाबासाहेबांकडे दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांच्या २६, अलिपूर रोड येथील बंगल्यावर पोहोचलो. तिथे दिल्लीचे सोहनलाला शास्त्री, शंकरलाला शास्त्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काही वेळातच बाबासाहेब हातात काठी घेऊन नानकचंद रत्तू यांच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर आले. आमच्यासमोरच ठेवलेल्या आरामखुर्चीत येऊन बसले. आर. एस. मून यांनी माझी अोळख बाबासाहेबांशी करून दिली. बाबासाहेबांनी पहिलाच प्रश्न विचारला, “काय रे पोरा, रेवाराम कवाडे आणि गोडबोले आले होते. त्यांनी १४ आॅक्टोबर ही दीक्षा समारंभाकरिता तारीख घेतली आहे. समारंभाची व्यवस्था होईल काय?’ तसे तर मी बाबासाहेबांना अनेक वेळा पाहिले होते. पण, बाबासाहेबांचा तो धीरोदात्त चेहरा, समोरासमोर बसून चर्चा करण्याचा पहिलाच प्रसंग होता. मी एकदम भारावून गेलो. तोंडातून एकच शब्द निघाला, ‘होय बाबा!’ https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-babasahet-ambedkars-colleague-sadanand-fulzele-passed-away-126984574.html
 
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील ज्या पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मदीक्षा घडविली. त्या दीक्षा समारंभाची संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळेस ते नागपूरचे उपमहापौर होते. त्या पहिल्या ऐतिहासिक सोहळ्यापासून ते स्मारक समितीचे कार्यवाह म्हणून दीक्षाभूमीवरील संपूर्ण जबाबदारी ते सक्षमतेने पार पाडत होते. त्यामुळेच दीक्षाभूमीचे ते खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते. १ नोव्हेंबर १९२८ रोजी एका श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात धरमपेठ येथे त्यांचा जन्म झाला. वडील श्रीमंत मालगुजार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बाळकडू त्यांना लहानपणापासून कुटुंबातूनच मिळाले. १९४२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. नागपूरला अधिवेशन झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. १९४६ साली न्यू इंग्लिश हायस्कूल सीताबर्डी नागपूर येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर प्रथम मॉरिस कॉलेज आणि नंतर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते बी.ए. झाले.