"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७६:
[[महात्मा गांधी]] अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो. तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये '[[हरिजन]]' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता. पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व '[[अनुसूचित जाती]]' हा शब्द स्वीकारण्यात आला आहे. <ref>https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/</ref>
 
 
== राजकीय कारकीर्द ==
[[File:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech.jpg|thumb|एका सभेत भाषण करतांना आंबेडकर]]
आंबेडकरांची सामाजिक व राजकीय कारकीर्द इ.स. १९१९ मध्ये सुरू झाली होती आणि सन १९५६ पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रातील विविध पदे भूषविली. डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल) सदस्य म्हणून नेमले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने पार पाडली आणि अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते सन १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=273|language=Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.ambedkar.org/ambcd/13A.%20Dr.%20Ambedkar%20in%20the%20Bombay%20Legislature%20PART%20I.htm|title=13A. Dr. Ambedkar in the Bombay Legislature PART I}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=AeGQ8Bnn3XwC&pg=PA231&lpg=PA231&dq=In+1926,+Ambedkar+was+appointed+as+a+member+of+the+Bombay+Legislature&source=bl&ots=by41UAOG17&sig=ACfU3U3_d32QkngHTej8KecSCmneqml_tw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwilwPjQkOnjAhUjH48KHUgDAL4Q6AEwEnoECAoQAQ#v=snippet&q=Dec.+1926+the+Bombay+Legislative+Council&f=false|title=Ambedkar and His Writings: A Look for the New Generation|first=Raj|last=Kumar|date=9 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1920s.html</ref>
 
अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नाहीत याची जाणीव आंबेडकरांना होती. त्यामुळे ते [[इ.स. १९३०]] मध्ये [[लंडन]] येथे भरलेल्या पहिल्या [[गोलमेज परिषद]]ेस अस्पृश्यांचे प्रतिधीनी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी देशातील अस्पृश्यांच्या परिस्थीतीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटीश सरकारने मान्य केला. परंतु [[महात्मा गांधी]] यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरम उपोषण सुरू केले. नंतर [[पुणे करार]] झाला.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख किंवा अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष|स्वतंत्र मजूर पक्षाची]] (इनडिपेनडेन्ट लेबर पार्टी) स्थापन केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref> [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref>https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1850654492 |pages=76–77 }}</ref> आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=245|language=Marathi}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=978-1850654490 |pages=76–77 }}</ref><ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची [[जवाहरलाल नेहरू]] यांचेशी पहिल्यांदा भेट झाली. तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची [[सुभाषचंद्र बोस]] यांचेशी भेट झाली होती.<ref>https://books.google.co.in/books?id=boCDDwAAQBAJ&pg=RA2-PA1942&lpg=RA2-PA1942&dq=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&source=bl&ots=s_oztjMot6&sig=ACfU3U2W0-B9SUdAwABfr0Hp2gGOL4UHjw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjlyqT_-p3nAhXl7HMBHUY6DYYQ6AEwDXoECAgQAQ#v=onepage&q=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&f=false</ref>
 
[[File:A photograph of the election manifesto of the All India Scheduled Caste Federation, the party founded by Dr Ambedkar.jpg|thumb|right|300px|[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|अखिल भारतीय दलित फेडरेशनचे]] निवडणूक घोषणापत्र, १९४६]]
आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची' [[इ.स. १९४२]] मध्ये स्थापना केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref> शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, जिचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इसवी सन १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकर संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम करीत होते.<ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=maFRVrOe1PQC&pg=PA239&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATABegQIARAK#v=onepage&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Emancipation of Dalits and Freedom Struggle|first=Himansu Charan|last=Sadangi|date=13 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&printsec=frontcover&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATAGegQIARAk#v=snippet&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Dr. Ambedkar: Life and Mission|first=Dhananjay|last=Keer|date=13 August 1971|publisher=Popular Prakashan|via=Google Books}}</ref><ref name=autogenerated2>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1850654492 |page=5 }}</ref>
 
आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/news/2011/03/110331_history_this_day_akd|title=इतिहास के पन्नों से : भारत में दलाई लामा, अंबेडकर को भारत रत्न|website=BBC News हिंदी|accessdate=25 अप्रैल 2019}}</ref> पाकिस्तानची मागणी करणाऱ्या [[अखिल भारतीय मुस्लिम लीग|मुस्लिम लीगच्या]] लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी "[[थॉट्स ऑन पाकिस्तान]]" (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये "[[पाकिस्तान]]" या संकल्पनेचे सर्व बाजूंनी विश्लेषण केले गेले. ज्यात त्यांनी मुस्लिम लिगच्या [[मुसलमान|मुसलमानांसाठी]] वेगळ्या देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका केली यासोबतच हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.<ref>{{citation |last=Sialkoti |first=Zulfiqar Ali |title=An Analytical Study of the Punjab Boundary Line Issue during the Last Two Decades of the British Raj until the Declaration of 3 June 1947 |journal=Pakistan Journal of History and Culture |volume=XXXV |number=2 |year=2014 |url=http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |p=73–76 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20180402094202/http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |archivedate=2 April 2018 |df=dmy-all }}</ref><ref>{{citation |last=Dhulipala |first=Venkat |title=Creating a New Medina |url=https://books.google.com/books?id=1Z6TBQAAQBAJ&pg=PR2 |date=2015 |publisher=Cambridge University Press |isbn=978-1-107-05212-3 |ref={{sfnref|Dhulipala, Creating a New Medina|2015}} |pp=124,&nbsp;134,&nbsp;142–144,&nbsp;149}}</ref>
 
आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष '[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) मध्ये बदलताना पाहिला, परंतु सन १९४६ मध्ये [[भारतीय संविधान सभा|भारतीय संविधान सभेसाठीच्या]] झालेल्या निवडणुकीत हा पक्ष उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या (आजचा पश्चिम बंगाल) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मुसदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी तयार केलेली [[भारताची राज्यघटना]] २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना [[भारताचे कायदा व न्यायमंत्री]] म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या [[हिंदू कोड बिल]]ास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२ आणि १४३|language=मराठी}}</ref><ref name="Firstpost 2015">{{cite web | title=Attention BJP: When the Muslim League rescued Ambedkar from the 'dustbin of history' | website=Firstpost | date=15 April 2015 |url=http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | accessdate=5 September 2015 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20150920032027/http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | archivedate=20 September 2015 | df=dmy-all }}</ref>
 
आंबेडकरांनी सन १९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली, परंतु त्यांचे माजी सहाय्यक आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर सन १९५२ मध्ये आंबेडकर [[राज्यसभा सभासद|राज्यसभेचे सदस्य]] (खासदार) झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले (काँग्रेस पक्षाचा विजय). सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते.
 
आंबेडकर दोनदा [[भारतीय संसद|भारतीय संसदेचे]] वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य बनले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता, परंतु हा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=5 March 2019}}</ref>
 
बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "[[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत [[एन. शिवराज]], [[यशवंत आंबेडकर]], पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. [[एन. शिवराज]] यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.<ref>{{Cite book|title=सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर|last=खोब्रागडे|first=फुलचंद|publisher=संकेत प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=नागपूर|pages=२० व २१|language=मराठी}}</ref> १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत डॉ. आंबेडकरांच्या पक्षाचे नऊ सदस्य निवडूण गेले होते. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref>https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/</ref>
 
==संदर्भ==