"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १११:
=== मुंबई विद्यापीठ ===
भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले. त्यानंतर ३ जानेवारी [[इ.स. १९०८]] रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५१|language=मराठी}}</ref> आंबेडकर घराण्यात सर्वप्रथम भीमरावच महाविद्यालयाचे शिक्षण शिकू लागले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५१|language=मराठी}}</ref> महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व पर्शियन विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. यामुळे इंग्लिश विषयाचे प्राध्यापक म्युल्लर व पर्शियन विषयाचे प्राध्यापक के.बी. इराणी यांचे ते आवडते विद्यार्थी होते. जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांचेकडून भीमरावांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. भीमरावांनी सन १९१२ च्या नोव्हेंबर महिन्यात बी.ए. ची परीक्षा दिली व सन १९१३ च्या जानेवारी महिन्यात ते बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. [[मुंबई विद्यापीठ]]ाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५२|language=मराठी}}</ref> त्यांनी [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली होती. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून भीमराव बडोदा संस्थानात नोकरीसाठी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडीलांशी भेट झाली आणि ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५३|language=मराठी}}</ref> यामुळे ते बडोदा येथील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४|language=मराठी}}</ref>
 
=== कोलंबिया विद्यापीठ ===
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar in Columbia University.jpg|thumb|right|१९१३-१६ दरम्यान कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यार्थी डॉ. आंबेडकर]]
 
बी.ए. उत्तीर्ण झाल्यामुळे भीमरावांना पुढील वाटचाल करण्यासाठी काही पर्याय खुले झाले. नोकरी करणे व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, हा एक पर्याय होता तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, हाही एक पर्याय होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५३|language=मराठी}}</ref> महाराज [[सयाजीराव गायकवाड]] बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी भीमराव महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराज काही बोलले नाही मात्र त्यांनी भीमरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यासाठी भीमरावांना अमेरिकेत पाठविणे, पसंत केल्याचे सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४|language=मराठी}}</ref> महाराजांनी भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४|language=मराठी}}</ref> या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करू लागले व २१ जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील [[न्यूयॉर्क]] येथे पोहचले. या शहरातील [[कोलंबिया विद्यापीठ]]ामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५५|language=मराठी}}</ref> त्यांनी या विद्याभ्यासासाठी प्रमुख विषय म्हणून [[अर्थशास्त्र]] हा विषय निवडला आणि जोडीचा इतर विषय म्हणून [[समाजशास्त्र]], [[इतिहास]], [[राज्यशास्त्र]], [[मानववंशशास्त्र]] आणि [[तत्त्वज्ञान]] हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचे भरपूर वाचन केले व दोन्ही विषयांवर अभ्यासपूर्ण प्रभुत्व मिळवले. यामुळे विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५६ व ५७|language=मराठी}}</ref>
 
दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात [[लाला लजपतराय]] यांनी भीमरावांशी ओळख करुन घेतली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref> भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लाला लजपतराय व विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक [[एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन|एडवीन सेलिग्मन]] तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref> प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी भीमरावांच्या ज्ञानाची स्तूती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल गौरोद्गार काढले की, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरांचे अंतरंग|last=गोखले|first=द.न.|publisher=|year=|isbn=|location=|pages=|language=मराठी}}</ref>
 
एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी 'एन्शंट इंजियन कॉमर्स' (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए. ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर 'अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी' नावाचे प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७ व ५८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरांचे अंतरंग|last=गोखले|first=द.न.|publisher=|year=|isbn=|location=|pages=|language=मराठी}}</ref>
 
त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. या डॉक्टरेट पदवीसाठी 'द नॅशनल डिव्हिडण्ट ऑफ इंडिया: अ हिस्टोरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी' (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरु केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५८|language=मराठी}}</ref> सन १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारुन त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच भीमरावांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६२ व ६३|language=मराठी}}</ref> मात्र पीएच.डी. चा डॉक्टरेट प्रबंध स्वीकारल्यामुळे सन १९१७ मध्येच विद्यापीठाने भीमरावांना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली आणि 'भीमराव रामजी आंबेडकर' हे 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच इ.स. १९२५ मध्ये आंबेडकरांचा पीएच.डी. चा प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रितसर प्रदान करण्यात आली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३|language=मराठी}}</ref> आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन होते, त्यांनीच या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.<ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथमहाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drbacmahad.org/Speeches/the-evolution-of-provincial-finance-in-british-india.pdf|title=The Evolution of Provincial Finance in British India|last=Ambedkar|first=B.R.|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३|language=मराठी}}</ref>
 
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. [[ए.ए. गोल्डनवायझर]] यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या [[मानववंशशास्त्र]] विषयाच्या चर्चासत्रात '[[कास्ट्स इन इंडिया|कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनिसीस अँड डिव्हलपमेंट]]' (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३|language=मराठी}}</ref> शोधलेखात त्यांनी शास्त्रीय विवेचन केले होते. हा शोधलेख इ.स. १९१७ च्या मे महिन्यात 'इंडियन अँटीक्वेरी' नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाला, जे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३|language=मराठी}}</ref>
 
कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना [[जॉन ड्युई]] यांचेही मार्गदर्शन लाभले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोदन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी इ.स. १९१६ च्या फेब्रुवारी मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग इ.स. १९१६ च्या मे महिन्यात लंडनकडे रवाना झाले.<ref name=":3" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५९|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०|language=मराठी}}</ref>
 
==संदर्भ==