"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १८८:
==जातीयतेचा व अस्पृश्यतेचा विरोध ==
सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी 'अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,' यासारख्या मागण्या केल्या होत्या.<
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपणहोऊन आंबेडकरांना भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत '[[मूकनायक]]' नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशीत करण्यात आला. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref>
आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] सुरू केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?redir_esc=y&id=Wx218EFVU8MC&q=Shahu+meets+ambedkar#v=snippet&q=Shahu%20food&f=false|title=Dalit Movement in India and Its Leaders, 1857-1956|last=Kshīrasāgara|first=Rāmacandra|date=1994|publisher=M.D. Publications Pvt. Ltd.|year=|isbn=9788185880433|location=|pages=135|language=en}}</ref>
महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' (अर्थ: ईश्वराची लेकरं) ही संज्ञा वापरत, तसेच ते याच नावाचे एक नियतकालिकही चालवले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'अस्पृश्य हे हरिजन असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?, असा सवाल करत त्याच काळात 'हरिजन' हा शब्द वापरण्यास विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता. पुढे चार दशके उलटून गेल्यानंतर १९८२ सालात केंद्र सरकारने 'हरिजन' वर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन' च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.<ref>https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/</ref>
|