"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४७०:
[[चित्र:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]
बाबासाहेबांनी आपल्या नवीन बौद्धांना, ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्या बौद्ध धर्माचेच सार आहेत, अशा स्वतःच्या [[२२ प्रतिज्ञा]] दिल्या ज्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला हिंदू देव-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून [[पंचशील]], [[अष्टांगिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाचा आहे.
 
 
=== आंबेडकरानंतर बौद्ध समाज ===
आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी [[दिल्ली]]ला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग [[आग्रा]] सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीच कमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.<ref name=":2" />
१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी [[महाराष्ट्र]]ात फक्त २४८७, [[पंजाब]]ात १५५०, [[उत्तर प्रदेश]]ात ३२२१, [[मध्य प्रदेश]]ात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती.<ref>भारतीय जनगणना,
१९५१ व १९६१</ref><ref name=":0" /> ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती. म्हणजेच भारतात १९५९ मध्ये ४.५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीयांची होती आता हीच बौद्ध लोकसंख्या २०११ मध्ये ५.५% झाली असून भारतीतील १२१ कोटी जनतेत ६.७ कोटी बौद्ध आहेत.<ref name=":2" /><ref>[https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false]</ref> मात्र सरकारी आकडेवारीनुसार, इ.स. २०११ मध्ये भारतातील बौद्धांची लोकसंख्या अवघी ८५ लाख (०.७%) आहे.
 
== महापरिनिर्वाण ==