"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४७:
आंबेडकरांची राजकीय कारकीर्द इ.स. १९२६ मध्ये सुरू झाली आणि सन १९५६ पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रातील विविध पदे भूषविली. डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईच्या राज्यपालांनी त्यांना बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (मुंबई विधानपरिषदे) सदस्य म्हणून नेमले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने घेतली आणि अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते सन १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.
 
१९३६ मध्ये आंबेडकरांनी [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाची स्थापना केली. ह्या पक्षाने सन १९३७ च्यामध्ये मध्यवर्तीमुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकल्या होत्या. आंबेडकरांचा पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते. आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
 
१९३६ मध्ये आंबेडकरांनी [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाची स्थापना केली. ह्या पक्षाने १९३७ च्या मध्यवर्ती विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकल्या. आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
 
[[ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] एक सामाजिक-राजकीय संघटना होती, जिची स्थापना दलित शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमेसाठी आंबेडकरांनी सन १९४२ मध्ये केली होती. सन १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकर संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री (मजूरमंत्री) म्हणून काम करीत होते.
Line २५८ ⟶ २५७:
आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती फेडरेशन) मध्ये बदलताना पाहिला, परंतु सन १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत हा पक्ष उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या (आजचा पश्चिम बंगाल) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले.
 
आंबेडकरांनी सन १९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली, परंतु त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर सन १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य (खासदार) झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले (काँग्रेस पक्षाचा विजय). सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. मात्र या निवडणूकीत आंबेडकरांच्या [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]] पक्षाचे ७ उमेदवार निवडणूक जिकूंन लोकसभेचे सदस्य बनले होते.
 
आंबेडकर दोनदा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य बनले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता, परंतु हा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.
 
बाबासाहेब आंबेडकर]]ांनीआंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "भारतीय रिपब्लिकन पक्ष" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत [[एन. शिवराज]], यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.<ref>{{Cite book|title=सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर|last=खोब्रागडे|first=फुलचंद|publisher=संकेत प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=नागपूर|pages=२० व २१|language=मराठी}}</ref> १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत डॉ. आंबेडकरांच्या पक्षाचे नऊ सदस्य निवडूण गेले होते. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.
 
=== स्वतंत्र मजूर पक्ष ===