"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
 
== सुरुवातीचे जीवन ==
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>]]
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म [[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] रोजी सध्याच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर जिल्हा|इंदूर]] जिल्ह्यामधील [[महू]] (आता [[डॉ. आंबेडकर नगर]]) या लष्करी छावणीत झाला. त्यांचे पिता [[रामजी सकपाळ]] व आई [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाई]] यांचे ते १४वे अपत्य व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच हळूहळू त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे होते आणि महाराष्ट्रातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ''('आंबडवे' या गावचा ''अंबावडे'' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.''<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) भीमरावांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते; वडील रामजी सकपाळ हेही ब्रिटिश सैन्यात 'सुभेदार' व 'सैनिकी शिक्षक' या पदांवर कार्यरत होते. रामजींनी [[मराठी]] व [[इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. [[इ.स. १८९६]] मध्ये ५ वर्षीय भीमरावांच्या आई [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाईंचे]] मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर बालक भीमाचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली.
 
[[इ.स. १८९६]] मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह [[दापोली]] सोडली व ते [[सातारा]] येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]] च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील [[आंबडवे]] व मूळ आडनाव ''सकपाळ'' होते. [[कोकण]]ामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी आंबेडकर]] यांनी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही ''अंबावडेकर'' असा चूकीचा उल्लेख केलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे [[देवरूखे ब्राह्मण]] शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्यावर भीवाने होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे '[[आंबेडकर]]' झाले. भीमराव आपल्या विद्यार्थी जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14}}</ref>
 
रामजी सकपाळ यांनी [[इ.स. १८९८]] साली दुसरे लग्न केले आणि [[आंबेडकर कुटुंब|आपल्या कुटुंबासह]] [[मुंबई]]ला गेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एलफिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-14}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना [[हिंदू साहित्य]]ाची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले '[[गौतम बुद्ध|भगवान बुद्धाचे]] चरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. यावेळी त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणूकींची माहिती कळाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7-9EOFGLps0C&printsec=frontcover&dq=buddha+and+his+dhamma&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjF4r-B0-vZAhXM6Y8KHQjrAmEQ6AEILjAB#v=onepage&q=buddha%20and%20his%20dhamma&f=false|title=The Buddha and his Dhamma|publisher=Gautam Book Center|language=en}}</ref> रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. [[इ.स. १९०७]] साली तरूण भीमरावांनी [[मुंबई विद्यापीठ]]ाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. [[इ.स. १९०८]] मध्ये [[मुंबई विद्यापीठ]]ाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये त्यांचे लग्न [[दापोली]]च्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] हा मुलगा झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
 
== संदर्भ ==