"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 1 bare reference(s) with reFill 2
ओळ १:
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सुजात हे [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाचे युवानेते<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/vidarbha/sujat-ambedkar-said-help-underprivileged-save-democracy-216102|title=सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/|title=शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर|date=20 सप्टें, 2019|website=Lokmat}}</ref> आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.youtube.com/watch?v=JEpEGBjs010|title=Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi &#124; सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी|via=www.youtube.com}}</ref><ref name="auto3">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-47797013|title=सुजात प्रकाश आंबेडकर: वंचित बहुजन आघाडी पडद्यामागून मॅनेज करणारा ड्रमर पत्रकार|first=अभिजीत|last=करंडे|date=4 एप्रि, 2019|via=www.bbc.com}}</ref>
 
==वैयक्तिक जीवन==
ओळ ६:
 
==शिक्षण==
सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.<ref name="auto"/><ref>https: name="auto3"//www.bbc.com/marathi/india-47797013</ref> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.<ref name="auto2">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html|title=बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीची आंदोलनात उडी;प्रकाश अांबेडकरांचे पुत्र सुजातचे लाँचिंग|website=Divya Marathi}}</ref>
 
== पत्रकारिता ==
सुजात आंबेडकर यांनी दोन वर्षे अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून ते पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करणार आहेत.<ref name="auto"/><ref>https: name="auto3"//www.bbc.com/marathi/india-47797013</ref>
 
== राजकीय कारकीर्द ==
सुजात आंबेडकर हे राजकीय कार्ये करत असले तरी सक्रियपणे राजकारणात आलेले नाहीत. "लोकांची मागणी असेल तर राजकारणात येईल. पण तोवर लोकांना मदत करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मी कायम लोकांसोबत आणि चळवळीसोबत असेन," असं त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही पद नाही. निवडणुकीच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोशल मीडिया सांभाळणे, आंबेडकरी मुस्लीम, आणि अन्य बहुजन तरुणांना एकत्र बांधून ठेवणे, या जबाबदाऱ्या सुजात यांच्याकडे असतात. सुजात यांच्या आई डॉ. अंजली आंबेडकर यादेखील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची कार्ये करीत असतात.<ref>https: name="auto3"//www.bbc.com/marathi/india-47797013</ref>
 
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.<ref name="auto2"/>