"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ सुधारले
ओळ ३०:
२३ फेब्रुवारी २०१९ रोजी [[मुंबई]] येथील [[शिवाजी पार्क]]वर वंचित बहुजन आघाडीची ''ओबीसी आरक्षण परिषद'' झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत [[ओबीसी|ओबीसींच्या]] हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, [[ईस्ट इंडियन]] [[आदिवासी]] यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच [[शिवसेना|शिवसेनेच्या]] दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html|शीर्षक=शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?|संकेतस्थळ=News18 Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी [[धनगर]], [[माळी]], भटके, [[ओबीसी]], छोटे ओबीसी व [[मुसलमान]] अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला चार जागा|दिनांक=2019-03-04|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html|शीर्षक=लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>
 
१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी ''भारिप'' या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-lok-sabha-election-2019-bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-aghadi-says-prakash-ambedkar-1857578/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168/amp|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mwww.lokmat.com/akola/bharip-bahujan-mahasangh-will-merge-vanchit-bahujan-alliance-big-decision-prakash-ambedkar/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय|last=author/online-lokmat|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/a-big-decision-of-prakash-ambedkar-bharip-bahujan-mahasangh-will-merge-with-vanchit-bahujan-alliance-6034113.html|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचा Big Decision..भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref>
 
[[लोकसत्ता]]चे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण [[विदर्भ]], [[मराठवाडा]] आणि [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम महाराष्ट्रातील]] [[सांगली]], [[सोलापूर]] अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि वायव्य या तीन मतदारसंघांमध्ये [[दलित]] आणि [[मुस्लिम]]बहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47514003|शीर्षक=लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?|last=टिल्लू|first=रोहन|date=2019-03-10|access-date=2019-03-12|language=en-GB}}</ref>
 
==उमेदवारी==
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ [[लोकसभा]] उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये उमेदवाराच्या नावासमोर त्यांच्या [[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्मांचा]] उल्लेख करण्यात आला होता. [[धनगर]], [[कुणबी]], [[भिल्ल]], [[बौद्ध]], [[कोळी]], [[वडार]], [[लोहार]], [[वारली]], [[बंजारा]], [[मुसलमान|मुस्लिम]], [[माळी]], [[कैकाडी]], [[धिवर]], [[मांग|मातंग]], [[आगरी]], [[शिंपी]], [[लिंगायत]] आणि [[मराठा]] अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी [[मराठा|मराठ्यांशिवाय]] इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठयांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. [[शिवसेना]], [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], [[राष्ट्रवादी काँग्रेस]] ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.<ref name=":1">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47587553|शीर्षक='लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'|last=कोण्णूर|first=तुषार कुलकर्णी आणि मयुरेश|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref> प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-04-20}}</ref> महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघाच्या]] एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313|शीर्षक=महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?|last=Khushbu|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=India TV Hindi|भाषा=hindi|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref>
 
=== उमेदवारांची यादी ===