नदीच्या पाणी वाहण्याच्या तळाच्या पातळीत अचानक बदल झाल्यामुळे (त्या ठिकाणी खड्डा सदृस्य भाग निर्माण झाल्यामुळे) ती पाण्याची वाहणारी धार वेगाने त्या खड्ड्यात जाते. त्यामुळे प्रचंड दाबाची पाण्याची 'अधोगती'(downwords trend) निर्माण होते. ते पाणी खड्ड्याच्या भिंतींवरून शंक्वाकार पद्धतीने तळाशी जाते. अशा नैसर्गिक रचनेस भोवरा असे म्हणतात.

दोन नद्यांच्या संगमामुळे निर्माण झालेल्या प्रवाहातील वाहत्या भोवऱ्यास ग्रामिण भागात 'जलकुंभी' असे म्हणतात.

असेच भोवरे समुद्रात सुद्धा लाटांमुळे निर्माण होतात.